... ही वाट दूर जाते ... ३
ट्रिपचा शेवटचा दिवस . सकाळी उठल्यापासून ढग आणि रिमझिम पाऊस. खोलीतून ब्रेकफास्टला आलो आणि भल्या मोठ्या टेबलावर आधीचे दोन दिवस पुरून उरलेले पदार्थच पदार्थ. अगदी चकल्या, कडबोळी, चार - पाच प्रकारचे चिवडे - साबुदाण्याचे दोन आणि उरलेले पोह्याचे अन c ornflakes चे अशी पाकिटे, शिवाय गुलकंद घातलेले लाडू, केक, भडंग, सांबार वड्या, बाखर वड्या, चिरोटे, cheese , खरे दाणे आणि कळस म्हणजे अनारसे ... !! "अरे काय दिवाळीचा फराळ का काय रे ? "... "छे रे, अधिक महिन्याचे अनारसे आहेत !..". "इथे कोणाचे जावई रे आपण ?..". "अहो , आपण काल आणि परवा हे नव्हतो का खात ? "..."हो ,पण एकदम सगळं पाहून ....!!" ऐकण्यासारख्या गप्पा !!...शिवाय चहाची ready-mix पाकिटं ! आणि ह्या सगळ्याची वाटावाटी ! R eturn gift नको का सगळ्यांना आपल्या जम्बो पार्टीची ! "ऐका रे सगळे, पुढच्या वेळी एवढं आणायचं नाही खायचं ... गाडीला ओझं ..." "मागच्या वेळी आपण असंच म्हटलं होतं ना ... !" मग पोहे - उपमा आणि...