घर पहावं लावून ....
लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून ... अशी आपली म्हण आहे. त्यातला पहिला पार्ट तर झाला ! आता दुसरा पार्ट ... जो असा की आपण एकदाच काय, दोनदा - तीनदा करून बघू शकतो ... ! पहिल्या पार्टचं नको बोलायला ... आपल्या चुका आपणच कशाला जगजाहीर करा ... पण घराचं तसं नाही ... कुटुंब मोठं झालं म्हणून ... relocate झालो म्हणून ... सगळ्यांनाच दुसरा पार्ट पुन्हा पुन्हा व्हावासा वाटेल आयुष्यात ... निदान मला तरी तसं वाटत होतं ... ... तर , त्याची गोष्ट ... लग्न झालं आणि मी सासरी आले. एकत्र कुटुंब ... म्हणजे सासू सासरे आणि आम्ही दोघे ... घर सगळं लागलेलं ... सर्व सुस्थितीत ... त्यामुळे भाजी आणि किराणा सोडलं तर नवीन गोष्टी आणणे - नवीन संसार लावणे वगैरे काही नव्हतं .. . just सगळं जपून वापरणं ! आपल्या हातून आल्या-आल्या काही मोडायला नको, असाच विचार ! माझं सगळं काम जरा भीत भीतच ... मोठे दीर आणि जाऊबाई बहरीनला होते , म्हणून घरात 'फॉरीन'च्या वस्तू खूप, त्यामुळे ...