नवस
२१ प्रदक्षिणा, साखर फुटाणा ,
ये तो गुजरे जमाने हैं ।
ताजा ताजा नवस किया है ,
क्यों कि, हम दिवाने हैं ।।
नाहीतर काय ? वेड लागायची पाळी आली म्हणून नवस बोलले आहे ....
झालं ही तसंच. तो दिवस फारच अविस्मरणीय ! सकाळी लवकर उठून कामाला लागले. संध्याकाळी १० माणसं जेवायला येणार म्हंटल्यावर करायलाच हवं. त्यातही येणारी मंडळी सगळीच स्पेशल ! ३ लहान मुलं म्हणून सकाळपासून घर 'आवरायला ' लागले. शोभेच्या वस्तूंपासून ते स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या वगैरे काचेच्या बाटल्यांपर्यंत, सगळ्यांचं 'standard of living' उंच करायला हवं. ते होईपर्यंत, जाता येता इतरही लहान - सहान कामं करतच होते. आणि वीज गेली ! ९ वाजले, १२ वाजले, ३ वाजले तरी विजेचा पत्ता नाही. वीज नाही म्हणून पंप नाही, म्हणून पाणी नाही. गिझर नाही म्हणून अंघोळ, धुणं नाही. मिक्सरमधे खोबरं , कोथिंबीर, मिरच्या पडून ! food processor मधे अर्धवट भिजलेली कणिक पडून ! freezer मधलं icecream मिल्क शेक व्हायच्या वाटेवर ! आणि स्वयंपाक म्हणजे ३ पाहुणी मुलं आणि माझ्या नवऱ्यासाठी बिन तिखट, दोन 'शुगरवाले' म्हणून बिनसाखरेचं, एक ' प्राणीमित्र ' तरुण vegan, आणि आजीबाई मागच्या महिन्यात काशीला जाऊन मीठ सोडून आलेल्या .... ! अशा परिस्थितीत घरची बाई नवस नाही बोलणार तर काय करेल ?
असो. काही लोकांना नाही पटत नवस बोलणं वगैरे. पण रंजल्या गांजलेल्यांना काहीतरी आधार हवा असतो. आपण देवाला नाही मागायचं तर कोणाला ? आणि त्याबद्दल जे कबूल करु , ते त्या संकटातून बाहेर पडण्याबद्दल thanks-giving असतं. जेवढं आपल्याला झेपेल तेवढं. त्याला काही लोक लाच म्हणतात. पण देव 'मागत' ही नाही आणि 'खात' ही नाही. आपणच 'मागतो' आणि आपणच 'खातो'. शिवाय देवाला लाच देणारे आपण कोण ? त्याला फारतर 'अर्घ्य ' म्हणू शकतो . त्याने दिलेल्यातलंच त्याला थोडंसं परत ! bribe/लाच ' काम व्हायच्या आधी देतात, नवस नंतर फेडतात. नवसाला लाच म्हणून लाच घेणाऱ्यांना देवाचा दर्जा का द्यायचा ?
लहानपणी हे खूप असायचं, "देवा, आजचा एवढा पेपर नीट जाऊ दे, २ पैशांची खडीसाखर ठेवीन, आणि पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून अभ्यास करीन ." हे सगळे वायदे व्हायचे. त्यात सगळ्यांचा आवडता देव मारुती. कारण देवळात जायची परवानगी पटकन मिळायची. इतर ठिकाणी उनाडक्या करण्यापेक्षा , ' जाऊ दे , देवळात जातोय तर ' असं आई वडील म्हणायचे . पण मला नेहेमी प्रश्न पडायचा, की ह्या मुलांकडे पैसे कुठून येतात -कसे काय असतात ? माझ्या वडीलांना मुलांनी पैशाला, बाजारातून नुकत्याच आणलेल्या वस्तूंना, न धुतलेल्या भाज्यांना वगैरे हात लावलेला अजिबात आवडायचं नाही. अस्वच्छ असतात म्हणून . जे हवं ते आणून द्यायचे . पण हातात पैसे कधीच नाही .मला त्याची इतकी सवय झाली आहे की अजून पैशांची ,नोटांची देवाण घेवाण झाली की मी आधी हात धुते. सांगायचा मुद्दा , देवासाठी का होई ना , पण खडी साखर आणायची कशी ?
लहानपणीच्या गोष्टी जाऊ द्या, जरा मोठेपणी कॉलेजमध्ये वगैरे असतांना तर ह्या गोष्टींवर मुद्दाम विश्वास ठेवायचा नसायचा. उलट "कर नापास, काय होईल ? एक वर्ष घरी बसून धुणं - भांडी करीन " कारण असाच धाक असायचा - नापास झाल्यास ! वर आणखीन देवाला म्हणायचं, "तुझी मर्जी ! पण त्यामुळे आई बाबांना काय काय बोलणी ऐकावी लागतील ... घराण्याच्या नावाला बट्टा लागेल वगैरे वगैरे, तूच पहा !" आणि मग देवदयेने सगळी मंडळी पुढच्या वर्गात जायची ! त्यातही मजा, त्या काळी सगळे results पेपरात छापून यायचे, आणि घरी-दारी, शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी सगळ्यांकडे आपला नंबर असायचा ! सगळी मंडळी जशी काही टपलेली ! कधी ही नापास होते आणि मग ... ! असो. नवस न बोलताही देवानं राखलं, आणि इतक्या उत्तम तऱ्हेने राखलं, की अजूनही त्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही !...
मुलं - बाळं झाल्यावर तर नवस बोलणं म्हणजे अक्षरशः जाता-येता ! दिवसभर छान खेळून, न रडता, रात्रभरात एकदाही न उठता असं झोपलेलं बाळ , सकाळी मात्र तापाने फणफणलेलं नाहीतर पोटाचा बाजा वाजलेला ! डॉक्टरांकडे जाऊन, त्यांचा चेहरा पाहून, घरी येई पर्यंत बाळ दुरुस्त झालेलं असायचं ते नवसामुळेच ! कारण तोपर्यंत माझे किमान ४ - ५ तरी देव झालेले असायचे ! अर्थात हळू - हळू मुलं मोठी झाली आणि मी हिमालयातल्या देवळांपासून जवळच्या देवळापर्यंत आले ! आणि एकदम टोकाला जायचं नाही हे ही कळलं !
मधल्या - नुकत्याच झालेल्या lockdown च्या काळात, सगळंच बदललं. आणि नवसाचे प्रकारही ! घराबाहेर पडायचं नाही म्हटल्यावर, देवाला जाणं काय दारा बाहेर पडणं देखील शक्य नव्हतं आणि आपली तब्येत सांभाळणं सगळ्यात महत्वाचं ! मग मी नवसाचा mode बदलला ! " आता ही सर्दी बरी होऊ दे, मी रोज अर्धा तास जास्त चालीन, किंवा आठवडाभर गोड खाणार नाही," वगैरे नवस मी बोलते ! म्हणजे सर्दी बरी होवो ना होवो, पण वजन, BP, sugar, cholestrol वगैरे control मधे राहतं ! चालता चालता रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणणे वगैरे ही ! श्लोक म्हंटल्यामुळे मेंदूला व्यायाम होतो, Alzheimer's होत नाही, mood छान होतो, lungs ना exercise होतो etc etc etc ! मुख्य म्हणजे नवस फेडायला आपण जे ही करायचं promise करत असतो, मग ते लोकांना असो का देवाला, ते जरा जास्त realistic, doable , आणि economically viable , वगैरे सगळ्याचा सुवर्ण मध्य ! ... आमके आम, और गुठलीयोंके दाम !....
अलके, लहानपणापासून ते आजपर्यंत च्या नवसांचं ,बदलत जाणारं रूप ...perfect वर्णन !!!शेवटही छान केला आहेस.प्रत्येकानी अनुभवलेलं असतं ते तुझ्या लिखाणात उतरतं, त्यामुळे आपलं
ReplyDeleteआपलं वाटतं,आणि रंजकही!!!
Thank you, पण कोणाला ? नावच नाही कॉमेंट मधे.
ReplyDeleteपण thank you , thank you , thank you , so much अजून नाव लक्षात येत नाहीये !!😢
ReplyDelete