Posts

Showing posts from April, 2024

उन्हाळा

       बंगलोरमधलं तापमान  ३८.५ ... अरे बापरे ... काय उन्हाळा हा ... कसं होणार आहे आपलं, अजून तर एप्रिल संपायचा आहे ... मे महिना कसा काढणार आहोत आपण ... AC  आणायचा का ? ... का आपला cooler ... मी नवऱ्याशी चर्चा करत होते ... अगदी युद्ध पातळीवर ... आणि फोन वाजला....       "अगं, काय गं, तुमच्याकडे म्हणे खूपच उन्हाळा आहे आणि पाणी नाहीये ?    इथे tv news मधे सांगितलं ... काय पाण्यावरून नळावर भांडणं ... तुम्ही कसं गं करताय ? "    पुण्याहून माझ्या मैत्रीणीचा भडीमार.     "अगं, आमच्या भागात  नाही पाण्याचा प्रश्न ... पुरेसं आहे ... खरं म्हणजे मुबलक आहे, पण असं मोठ्यांदा म्हणून मी दृष्ट  नाही लावणार आमच्या पाण्याला ... हां, काही भागात मात्र अगदी serious टंचाई आहे "...      आणि मग असे फोन येत आहेत.   न्यूज मधे काय सांगितलं, दाखवलं कोण जाणे ... अर्थात काही ठिकाणी परिस्थिती फार बिकट आहेच, पण पाऊसच नसेल तर काय करणार ...      उन्हाळ्यावर बोलायचं तर विदर्भातल्या लोका...

चैत्रगौर

      गेल्या वर्षी हादगा-भुलाबाईच्या मिषाने कोजागिरीपर्यंत रेंगाळलेली माहेरवाशीण ...., पाय निघता निघत नाही.... तिला सगळ्या मुलीबाळींनी विचारलं, " गौराई, तुझं ठाणं गं, आता कधी येणं गं ?"     त्यावर ती म्हणते, " आता येणं चैत्र मास ... "...  तीच  चैत्रगौर !    कबूल केल्याप्रमाणे आली !  चैत्र पालवी, अंब्याचा मोहोर माळून , मोगरा - चाफा लेऊन , सजलेली !  ...    तिच्या आधी चैत्र आला  ! गुढी पाडवा ! आणि नंतर गौरी तृतीया - गौरी तीज ! त्या दिवशी चैत्र गौरीचं आगमन  !  अक्षय तृतीयेपर्यंत आता सगळ्या बायका तिच्याच तैनातीत !   तिच्या स्वागताला रोज चैत्रांगण काढायचं, तिच्याकरता पन्हं , अंब्याची डाळ !     मग एखादा सगळ्यांच्या सोयीचा दिवस पाहून हळदीकुंकू .  तिचा उत्सवच !  स्वागत समारंभ !  गौर नटते - सजते, तिला झोपाळ्यावर बसवायची, आणि मग घरोघरी निमंत्रणं, हळदीकुंकवाची ! ' लेकी - सुना - इष्ट मैत्रिणींसह यावे,' असंच बोलावणं !   सगळ्या जणी दागिने घालून नटून-थटून येणार....

रांगोळी

Image
    मी तिसरीत असतांनाची गोष्ट.    त्या दिवाळीच्या सुट्टीत कशी कुणास ठाऊक, काहीतरी नवीन वेगळं करायची हुक्की आली आणि आईच्या मागे लागले.    "काय करू ?..काहीतरी वेगळं करायचंय .."..दिवाळीत आजोळी जायचं , तर तिथे आजीवर impression पाडायला काहीतरी करणं  भाग होतं ... !      आई म्हणाली "ये, रांगोळी शिकवते" ... "ठिपक्यांची नको" ... "बरं , ठिपके सोडून शिकवते" ..."ते नको".. पण या वेळी आई दाद द्यायला तयार नव्हती ...तिला सगळ्याच तऱ्हांच्या माहीत होत्या !...   + ,   X , ।। ,  कंसात कंस  (  ( .. )  ) अशा ही ! तिने ४ ठिपके ४ ओळी काढल्या आणि मी रांगोळ्यांच्या जगात प्रवेश केला, आणि खरंच अनंत असं विश्व मला सापडलं ! कधी ओळीत ठिपके काढत, तर कधी ते कमी कमी करत ! ..भूमितीतली चित्रं , फुलं- पानं , माणसं , प्राणी , गालिचे आणि देखावे ही !!!...     ... आणि त्या विश्वात मी रमले !   ठिपके नीट ओळीतच काढायचे ... रेघ जितकी बारीक येईल तितकी चांगली ... तुटक नको ... गिरवायचं नाही, पुसायचं नाही ... रांगोळी काढून झाली की इकडून तिक...