पसारा
खूप दिवसांनी मैत्रीण जेवायला आली होती. अगदी जिवाभावाची मैत्रीण, जिला सगळं सांगावं, सगळ्यांची गाऱ्हाणी करावीं, तिचा सल्ला घ्यावा आणि निश्चिन्त व्हावं ! घरातल्यांशी फारच बेबनाव झाला की मी तिच्याकडे धाव घेते. तिचा सल्ला मानायचा की नाही हे जरा पहावं लागतं, कारण ते तिच्या तेव्हाच्या ' फॅड ' वर अवलंबून असतं, पण बरं वाटतं . तर, ती आली, जेवली आणि गप्पांना सुरुवात झाली. मधूनच ती वर खाली, इकडे तिकडे बघत होती. म्हटलं, ' बाई गं , वर पाहीलंस तर जळमटं दिसतील, खाली पाहीलंस तर धूळ आणि आजूबाजूला पसारा. तू आपली माझ्याकडे पाहून बोल कशी. उगीच मला टेन्शन देऊ नकोस, आधीच सगळ्यांनी पिसाळलंय मला. पसारा करण्यावरून रोज वादावादी, हे सगळं बदलायचंय मला. पुन्हा नव्यानी सुरुवात करते हवं तर. जरा शांती-समाधान नांदू दे, कुठेतरी चुकतंय ...' " तेच, तेच म्हणायचंय मला. सगळंच चुकलंय म्हणून तुला त्रास होतोय ! भांडणं , वाद हे तुमच्या स्वभावावर, गुणदोषांवर अजिबात अवलंबून नसतात बरं का ! तर घरात कुठे काय मांडलंय काय कुठे ठेवलंय, ह्यावर असतात. तुझ्य...