Reunion - २
५० वर्षांनंतर पुन्हा शाळेत जायचं ! त्याचं thrill ते काय वर्णावं ? मनात असंख्य विचारांची गर्दी आणि त्यांचा गुंता, रंगीबेरंगी धाग्यांचा - रेशमांचा एक मोठा पुंजका. एक सोडवायला जावं तर दुसऱ्याला गाठ बसतेय, एक बाजूला करावा तर आणखी चार मधे येताहेत. शेवटी ठरवून टाकलं, आता हा गुंता सोडवायचा नाही. दिसेल तो रंग, धागा मनात धरून ठेवायचा, साठवून ठेवायचा ! कधी मनसोक्तपणे समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या लाटांत पाय बुडवले असतील आपण ! तसे ! एखादेवेळी त्यातच बुडून जावं !
तर , तयारी सुरु झाली. हळूहळू सगळा कार्यक्रम, plans आकार घेऊ लागले. Zoom वगैरे सगळ्यांना जमायला लागलं. रात्री जेवणं वगैरे आटपून video calls ... ! कोणी काय करायचं, कोणी काय आणायचं ... ! काही मुलंमुली informal party च्या तयारीत. "समई आणीन मी, बरं का . त्याशिवाय काय event असतो का ? " त्यावर मुलं, " ए बायांनो, ते बास, जरा काही झालं की समया !!! औक्षण वगैरे नको का ?.." ... ..."अशानी प्राची रागावेल आता !! तुम्ही तिचं ऐकत नाही आहात ...". प्राची म्हणजे शाळेतली आमची co-ordinator ! आमच्याहून वयाने खूप लहान ! खरं म्हणजे आमच्या मुलांच्याच वयाची ! तिनेच आमची आवळ्यां - भोपळ्यांची मोट बांधली ! तिने आम्हाला किती आणि कसं झेललं, तिचं तीच जाणे ! केवढा पेशन्स आणि किती हसरी !!! ....
"तू गप रे, आम्हाला माहितीय कसं organize करायचं ते. प्राची काही रागावणार नाही , दरवर्षी सत्यनारायण, हळदीकुंकवं, ... सगळं arrange करत असतो आम्ही ..." "games चं बोला, कोण काय करतंय ? "... "आंधळी कोशिंबीर आणि अंताक्षरी सोडून काहीही चालेल ! " ... "शी: , तो काय सिनेमा आहे का ?"..."तुमचं काही सांगता येत नाही, कशी डोकी चालतील ते "... "आणि जेवायला काय ? ... मी arrange करू का ? " " नको .... तू drinks म्हणालास की पोरी गायब होतील, मग काय मजा ? ".... " xxx , अजूनही पोरी नाही म्हणजे मजा नाही म्हणतोस रे ! वय काय तुझं ? ".. "अरे आपल्याच वर्गातल्या आहेत नां !" असे संवाद ! पण कोणाच्या मनात काय, ते इतरांनी बरोबर हेरलेलं .... आणि मग खळखळून, नव्हे, खळाळून हसणं, आणि हे सगळं video call वर, नाहीतर chat वर ! अजून कोणीही कुणाला पाहिलं ही नव्हतं 50 वर्षांत ! तरीही !
"अगं केटरर आपल्याच शाळेतला ... त्याला सांग तिखट नको" ..." ही रडूबाई ...!" ..."बासुंदी ! हो, पण साखर नको "... "××× ! मग दूधच प्या की नुसतं . ..." ...."तुला फुल्या फुल्यांशिवाय बोलताच नाही येत का ?"... " अगं जरा बेतानी, नाहीतर चुकून group chat वर पाठवशील !"... " मग काय? जाऊ दे की ! ..." हो, नाही ,करता करता मेनू ठरला. आदल्या दिवशी हरीपूरला पिकनिक, मग भोगीच्या मेनूची पार्टी, त्यातही अर्धं तुझं , अर्धं माझं ! सगळं नीट ठरलं....आता फक्त भेटणं राहीलं होतं ...
तर , १९ तारखेच्या पार्टीत सगळी जणं एकमेकांना भेटली ,५० वर्षांनंतर !! उरली सुरली inhibitions गळून पडली , सगळं आकाश मोकळं झालं ! खऱ्या खऱ्या गप्पाटप्पा सुरू झाल्या !!! गेम्स झाले , गाणी झाली - पूर्ण गाणी ! सुंदर जेवण झालं ! तरी गडबडीत fishponds राहून गेले , पण ते नंतर सव्याज मिळाले , फोटो आणि कॅपशन्स सकट !!
वर्गाचा feel हळू हळू येत होता .... स्वतःची ओळख करून देतांना मी म्हणाले , ".... मी दहावीत शाळा सोडून गेले, तरी तुम्ही मला बोलावलंत..."... मी अगदी भावनेच्या भरात , कंठ दाटून वगैरे ..... आणि कोणीतरी मला काटलं ... एकदम जमिनीवर ..!!! " मग ? ...पुढे काय शिकलीस का नाही ? का शाळा सोडली ती सोडलीच ???" ... "ऑ , what do you mean ? "... पण लगेच ट्यूब पेटली ! ही शाळा आहे ! आणि मित्रांना असं सगळं बोलायचा हक्क आहे !...
...आधी , जेव्हा get together मध्ये आपली ओळख करून देतांना किती बोलायचं , ह्याची चर्चा चालू होती , तेव्हा सगळे एकमेकांना सांगत होते , "तू बोल , पण दोन मिनिटांत आवर . हा जास्त बोलला तर मागून शर्ट खेचू, नाहीतर टाळ्या वाजवायला लागू ... !!!"
त्या दिवशी घरी जातांना , एकमेकांना bye करतांना, सगळे जण उद्याचाच विचार करत असणार !! माझं मन तर एखाद्या पिसासारखं हलकं होऊन , वाऱ्याच्या झुळुकीवर तरंगत , कुठे चाललं होतं , कोण जाणे !!!......
Wow.....Alka, I relived those moments! And of course , it touched my heart.
ReplyDeleteThank you so much , I had not seen this for quite some time ! Thanks once again !😊
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteThank you , Dear
ReplyDelete