जळकथा
माझं आणि स्वैपाकघराचं अगदी अतूट नातं आहे. जे कैद्याचं आणि कोठडीचं , मुलांचं आणि शाळांचं ... लहानपणी स्वैपाकघरात पाऊल टाकलं, की " आधी बाहेर हो ..." हेच शब्द कानावर पडायचे. ते मनात इतकं ठसलं की नंतरही स्वैपाकघरात पाय ठेऊच नये असंच वाटायचं ... Variety is spice of life असं म्हणतात. माझ्या स्वैपाकात विचारूच नका, तोच पदार्थ रोज वेगळा होतो. इतके भरपूर spices असतात की वेगळे मसाले वापरायचं लक्षातच रहात नाही ! असंही म्हणतात की माणूस सुधारायला हवा असेल, तर टीका सहन केली पाहिजे. माझ्या मुलांसारखे ' महान टीकाकार ' घरात असून ही मी ' जैसे थे ' च आहे ! लग्न होऊन मद्रासला गेल्यावर मी रोज नवीन प्रयोग करत असे ! सासूबाई , सासरे गावाला गेले की स्वैपाकघर माझ्या ताब्यात असायचं . मग काय , दूध गॅसवर ठेवून पेपर वाचत बसणे , कुकर लावून अंघोळीला जाणे वगैरे अपघातही घडत असत. एकदा धिरडी करायचं ठरवलं. तयारी केली, तेवढ्यात आजीचं वाक्य आठवलं , ' धिरडं घाल आणि बागेत तुळशीला पाणी घालून ये, तोवर सुटेल ". आता नॉन - स्टिकमुळे चिकट...