Posts

Showing posts from January, 2025

२६ जानेवारी

      २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन  .  कधी नव्हे ते लवकर उठून, स्वैपाक, अंघोळ, देवपूजा आटपून ९च्या ठोक्याला मी TV समोर हजर ... परेड पहायला !    बाकी इतर वेळी ,  कोणाचं सरकार असो , त्याला घालून-पाडून बोलायला कमी न करणारी मी, परेड पहायला बसले की त्यांचं कौतुकच वाटतं, आणि  'अभिमानाने ऊर भरून येणे'  म्हणजे काय ते कळतं ..!   भले ही TV वर सगळं दाखवत नसतील, आपण super-powers पेक्षा ranking मधे खूप खाली असू, पण आपण अगदीच 'बिचारे' नाही आहोत , असं वाटतं.    एरवीचा गलथानपणा, मुजोरी, बेशिस्तपणा,   'चलता है' अशी प्रवृत्ती, भ्रष्टाचार, महिलांना दिली जाणारी वर्तणूक ... घरात-बाहेर सगळीकडेच ... हे परेडमधे कुठे दिसत नाही, आणि जिवाला 'सुकून' मिळतो.   ' दिलासा' हा शब्द कमी पडतो,  'सुकून' मधे जो  'सुकून' आहे तो special च ... !!      दिल्लीतला विजयपथ, राष्ट्रपती भवन, हे सगळं इंग्रजांनी बांधलं, पण त्याची चाळण नं  करता, आपण ते निदान नीट  maintain करतोय ह्याचं अप्रूप वाटलं....

निर्भया

  आज सकाळी सकाळी पेपरातील बातमी वाचली, आणि मूड गेलाय ... मूड गेलाय हे म्हणणं, understatement ... नव्हे  gross understatement of the decade   ... त्या कलकत्त्याच्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही,  कारण हा गुन्हा 'rarest of rare' असा नाही ,  हे वाचलं  आणि ... काय काय झालं म्हणून सांगू ... रक्त खवळून उठलं ... डोक्यांत  एक महा प्रचंड तिडीक गेली ...   अंगात आगीचा डोंब उसळला ... आपल्या अंगात कुणीतरी खंजीर खुपसावा असं काहीतरी आत तुटलं ... आणि हे definitely कलियुग आहे हे पटलं ... एरवी विशेष देव वगैरे न मानणारी मी ... अगतिकपणे देवासमोर उभं राहून म्हणावसं वाटलं ... तुझ्या राज्यात हे काय चाललं आहे .?.. पण त्याला जाब विचारणारी मी कोण ..?. अगतिकपणे.....कारण,  केवळ असहाय्य्य अशी मी ... ना पुरेसं धैर्य, ना resources , ना कुठे वट, ना powerful connections ... नुसतं सभांमध्ये ,  मंडळात वगैरे बडबड करून,  मोर्च्यांत सहभागी होऊन  , भाषणं ठोकून, काहीही होत नसतं ... केवळ एकाच शब्दात सांगायचं तर ... हे सगळं केवळ पोकळ ....     नि...

दिस चार झाले ...

         शाळेत असतांनाची गोष्ट.   एकदा रेडिओवर एक श्रुतिका लागली होती.   नाव-गाव काही आठवत नाही.  त्यातली गोष्ट थोडीफार आठवते.   पण त्यात एक गाणं होतं ... मन पाखरू पाखरू, किती दूरवरी जाय ... !   कोणी गायलं होतं माहित नाही, पण त्या मुलीचा आवाज, चाल आणि हे शब्द.  कसे कुणास ठाऊक ... मनात जाम घट्ट जाऊन बसले ... न विसरण्यासारखे ..! मनाचं पाखरू ...कसं , कधी , किती दूर आणि कुठे जाईल , काही सांगता येत नाही ...त्याचा वेग ही कसा , तर निमिषार्धात पोचलेलं असेल ...अशा अर्थाचं गाणं . आणि जेव्हाही मी खूप अस्वस्थ होते, विनमस्क अशी असते, तेव्हा ते शब्द आपोआप येतात ... आणि , मी माझ्या आवडीच्या गावात , सांगलीतल्या घरात पोचलेली असते , मन आपोआप शांत होतं .. !आणि ,   ते शब्द माझ्या मनांत नाचत असतात , सतत .....      १५-२० दिवसांपूर्वीची गोष्ट ... खूप थंडी ... सतत  बुरबुर पाऊस ...  एकही गोष्ट मनासारखी जमत नव्हती ... कोणाचंच काहीही पटत नव्हतं ... सगळं  एकसुरी, एकरंगी, grey रंगाचं जग ... अर्धवट झो...