Posts

Showing posts from July, 2021

लग्न पहावं करून

          मुलाचं लग्न ठरलं, आणि घरात एकदम गडबड सुरु झाली !  ग्रहण सुटावं आणि चंद्र - सूर्याचं मुखदर्शन व्हावं तसं  !   हे करू, ते करू, आधी हे करायचं, ते मात्र अजिबात नाही .....   चर्चा, चर्चा आणि वाद !  घरात एकदमच लोकांचं येणं जाणं वाढलं. एरवी शांत झोपलेलं घर एकदम उठून कामालाच लागलं ! ...          आणि जाणीव झाली की आपल्याला काहीच माहीत नाही, अनुभव नाही, आणि मुख्य म्हणजे हे सर्व जगाला आपल्या आधीच माहीत आहे !  नातेवाईक आणि मित्र मंडळी पुढे सरसावली, सल्ले आणि अनुभव ह्यांचा पाऊसच. अधूनमधून खणखणाटही , खरंय,लग्न म्हणजे काही खेळ नाही ...          खेळ नाही कसा ?  खेळच .  अगदी मैदानी खेळ, बायकांचे खेळ, बुद्धिबळाचे डाव ...   सर्व काही. पहिल्याच सलामीला बहीण आली , " बाई गं , ताई गं , हा '  मेमरी गेम ' बरं का !  कधी, कुठे, केंव्हा, काय नेसणार आहेस, दागिने काय घालणार आहेस, लिस्ट कर. काही नसेल तर करून घे. "      काय मस्त आयडिया !  परत प...

शोध

            आव्हान आणि आवाहन  !   तीच व्यंजनं आणि तेच स्वर !   जरा इकडचं तिकडे केलं की दोन शब्द बनतात. पण त्यांच्या स्वभावात किती फरक !  एकाचं दुसऱ्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आपण विचार कसा करतो, ह्यावर ते अवलंबून असते.          आयुष्यात अनेक challenges  - आव्हानं आली . मुलांना मोठं करणं , हे पण एक चॅलेंजच असतं . अर्थात ते कोण कसं पेलतं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. माझ्यापुढेही असे अनेक चॅलेंजेस होते, आणि माझ्यापरीने मी ते हाताळले. सायकॉलॉजीचा    ' P ' ही  माहीत नसतांना - ( cy   का sy ? ह्यात P कुठे आला ? ) - एकच ठरवलं होतं की मुलांना कोणत्याही गोष्टीचा बाऊ - भीती घालायची नाही. होता होईतो सरळ उत्तरं द्यायची आणि  हाणामारी , शिक्षा न करता वळण लावायचं.       पण कधी कधी पंचाईत व्हायचीच ! मला काहीतरी युक्ती करावी लागायची. अशक्य कोटीतल्या कल्पनाही !         एकदा एक पाहुण्या बाई आल्या होत्या. सासूबाईंची लहानपणची मैत्रीण....

मोहमाया

        ही गोष्ट तशी जुन्या काळचीच  म्हणावी लागेल.  जग तेव्हा बरंच  वेगळं होतं . मोबाईल फोन हळूहळू स्वस्त होत होते, पण अजून whatsapp नी डोळे उघडलेले नव्हते. sms वगैरे होते, पण फारच कमी. त्यामुळे रोजच्या सुविचारांचा पाऊस नव्हता, की सकाळी उठल्या उठल्या कोणी मशीनला तेल घालावं तसं चमचाभर ज्ञान पाजत नव्हतं. ह्या जगात आपण वाटसरू आहोत, इथल्या कोणत्याच गोष्टीत जीव लावू नका, हे सर्व इथेच सोडून जायचंय, वगैरे फक्त हिंदी सिनेमाच्या गाण्यांत  आणि संत साहित्यात असायचं !         संसार करतांना घरातल्या सामानावर जीव लावणं जमलं नाही. सासूबाईंच्या हाताखाली  ' पडेल ते काम ' एवढंच ठरलेलं !  मी कसलाच हट्ट कधी केला नाही.  असं वाटायचं , आपण अध्यात्म जगतोय ! हे सगळं असंच्या असं सुनांच्या सुपूर्त करून मी जाईन  .... हसत हसत   ... !         मोठ्या मुलाचं लग्न झालं, सासू म्हणून प्रमोशन मिळालं, आणि spiderman   म्हणाला तसं, great powers   बरोबर  great responsibi...

My मराठी - ३

                   ' ह्या मालिकेतील प्रसंग , पात्र, कथा सर्व काही खरं  आहे. त्यात कोणाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजू नये.  आजकाल सगळीकडे हीच परिस्थिती आहे.               असं  TV तल्या  सारखं  का लिहितेय मी ? कारण त्याचा माझ्या मनावर फार परिणाम होतोय.  TV वरचं  मराठी ऐकलं की वाटतं   आपण बखरीतली भाषा तर बोलत नाही ? का मराठी भाषेचं जग फारच पुढे गेलंय ? बहुतेक काही दिवसांनी पहिलं जुनं मराठी साहित्य उदा.  ' लीळा चरित्र ' कोणाला कळणं राहिलं दूर, वाचताही येणार नाही. असो .                 एकदा एक तरुण जोडपं भेटलं रस्त्यात.   " तुमच्या मंगळसूत्रावरून ओळखलं  मराठी आहात म्हणून, ... तुम्ही कुठून आहात ? "   मी बुचकळ्यात पडले. हिला काय म्हणायचंय " तुम्ही कुठून आलात ?    की  इथे कुठून कडमडलात ?  तरी मी तिच्याच स्टाईलमधे म्हटलं, " हं , आम्ही घरून आहोत... "...

MY मराठी - २

               " इतकी सुंदर भाषा आहे, नका रे तिचा असा चुथडा करू  ..... "   कोण म्हणतेय हे वाक्य ?   आई म्हणत असेल तर काळ आहे ४० वर्षांपूर्वींचा, आणि मी म्हणत असेन तर आहे आपला १० - २० वर्षांपूर्वीचा.  आई इंग्लीश भाषेबद्दल म्हणायची, कारण मी मराठी शाळेत होते.   मी म्हणायची कारण मुलं इंग्लिश शाळेत शिकायची आणि त्यांना मराठी आलं पाहिजे हा माझा अट्टाहास होता ...                     दर  उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी गेल्यावर मराठीचं शिक्षण सुरू व्हायचं . घरात सुट्टीत मराठीच बोललं पाहिजे हा दंडक माझा . आई-वडील म्हणायचे  "असं मागे लागू नकोस, वर्षभर असतातच कटकटी अभ्यासाच्या "  " पण मराठी शिकणे ही कटकट नाहीये ..."  हे असंच चालू असायचं .  एक दिवस सगळी भावंडं जवळच्याच बागेत हिंडून-फिरून आली.  मुलं बस ऐवजी  टेम्पोतून आली , आणि मला म्हणाली ,      " धन्यवाद देवा, एका तुकड्यात घरी पोचलो... "      " ह्य...

माय मराठी

          एके काळी  मी स्वतःला अगदी मॉडर्न - नव्या युगाची प्रतिनिधी वगैरे समजायचे. साहजिकच प्रस्थापितांविरुद्ध  माझा लढा असायचा, आणि निरनिराळ्या पातळ्यांवर माझ्या चकमकी चालू असायच्या. त्यातलीच एक म्हणजे मराठी व्याकरण आणि शुद्धलेखन.           " व्याकरण हा शब्द 'शिक्रण ' सारखा लिहिला तर काय बिघडलं ? " असं आईशी भांडायला लागले की ती हतबुद्ध व्हायची . " बिघडायचं काय आहे ?  तसं लिहायचं नाही, म्हणजे नाही. बास , ह्या विषयावर चर्चा बंद.  'ऋषी' हा शब्द रुशी किंवा रुषी किंवा रिशी लिहिलास , तर जेवायला मिळणार नाही अशी धमकी मिळायची. शाळेतही तोच प्रकार, - 'उंदीर' च्या ऐवजी एकदा 'ऊंदीर' असं लिहिलं  आणि वर्गात पेपराचं जाहीर वाचन झालं ; मी  लिहिलेल्या उच्चारासकट , आणि वर्गात हास्यकल्लोळ उठला ! त्यातही सगळे मुलगेही हसले हा आणखी अपमान !          तेव्हापासून मला शुद्धलेखनाची गोडीच लागली आणि भीतीही बसली. काहीही लिहितांना मी फारच काळजीपूर्वक लिहू लागले.  आर्शीवाद  का आशीर्वाद , चपलख का ...