Posts

Showing posts from February, 2022

50 years reunion च्या निमित्ताने .. चिमण्या

      " हॅलो , तुला माहीत आहे का , " मेधाचा फोन आला .     "आपल्या वर्गाचं reunion आहे , 50 वर्षं झाली ना आपल्याला , मॅट्रिक होऊन " "ऑ , झाली पण इतक्यात ?" " हो , अगं जगाच्या हया टोकापासून ते त्या टोकापर्यंत पसरल्या आहेत  ,सगळ्यांना शोधतोय  " .... दाणे टिपून, चिमण्यांनी भुर्रर्र कन उडून जावं तसं मला वाटलं !        आणि मग मी आठवायला लागले , आपला वर्ग ... खिडकीपाशी पहील्या बाकावर मी आणि गीता , आमच्या मागे मेधा आणि गोळी , त्यांच्या मागे रजनी आणि बेन !!असं करता करता , सगळा वर्ग डोळ्यासमोर उभा राहीला ..    .....आणि आपली हिरवी साडी !....आणि ती कशी नेसायची ...पदर घेतल्यावर उजव्या हाताच्या करंगळी पर्यंत येऊन समोर खोचला पाहीजे !!  सुरूवातीला आई नेसवून द्यायची , मग काय बिशाद की तो सुटेल !! ' पदर खोचून कामाला लागणे ' म्हणजे काय ते आता कळतं !        त्यावर पूनम नी गाणं केलं होतं , " शालू हिरवा , पाचूनी मरवा , वेण्या वरती बांधा ... " , पुढचं मी सांगायला नकोच ! .. तिचं गाणं ऐकतांना ह...

घासाघीस

        मला बाजारात जायला मुळीच आवडत नाही.  एकतर मला हवी ती वस्तू नसण्याचीच शक्यता जास्त असते. आणि मिळालीच तर मला घासाघीस अजिबात जमत नाही. १०० रुपयांची वस्तू ९८ ला मागतांना मला फार अपराधी वाटतं .  मग तो AC लावलेल्या दुकानातला असो, नाहीतर नेहेमीचा .   फुटपाथ वरच्या किंवा छोटेखानी दुकानात ,  किंवा हातगाडीवाल्यांशी घासाघीस म्हणजे अगदी बंगाली सिनेमातली पिळवणूक वाटते.  पुष्कळदा त्याने ' चिल्लर नाही ताई ' असे म्हंटले की , मी वरचे पैसे सोडून देते आणि मग त्यावर दोन दिवस विचार करत बसते.           राज कपूरच्या एका सिनेमात असा एक सीन आहे की तो खेडेगावातला मुलगा काहीतरी विकत घेत असतो.  ती बाई म्हणते, " ३ आण्याला ४ " .     तर हा म्हणतो, " माई, मला ४ आण्याला ३ देतेस का ?"     विकणारी बाई म्हणते , " भोळं आहे गं पोरगं !"     मला कोणी भोळी - भाबडी म्हणणार नाहीत, पण ' ढ ' नक्की म्हणत असतील !      घासाघीस करण्याची माझी आठवण म्हणजे मी लहान असतांना आमच्याकडे...

ऊन ऊन खिचडी ...

       मद्रासचं महाराष्ट्र मंडळ.   मी सासूबाईंबरोबर गेले होते.  नवरा टूरवर.   पहिल्यांदाच त्याला सोडून 'एकटी' राहिले होते.  त्यामुळे मूड फार उत्तम नव्हता.  वरवर सगळ्यांशी हसून - बोलून, पण मनातल्या मनांत वेगळंच  चालू होतं, आणि कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. एक छानशा बाई वाचत होत्या,  "ऊन ऊन खिचडी, साजूक तूप ...  वेगळं रहायचं भारीच सुख ...!"   खूप मस्त कविता !  ऐकतांना एकीकडे हसू येत होतं, तर दुसरीकडे त्यातलं पटतही होतं .  शेवटही छान.  पण काय बरोबर, काय चूक.  दोन्ही बाजू बरोबर का दोन्हीही चूक ?  ...एकूण गोंधळच !  जो अजूनही चालू आहे !...      अशीच वर्षामागून वर्ष  गेली. प्रत्येकच पिढी ही   sandwitch  generation  असते , आणि आपण फारच बिचारे , असं प्रत्येकालाच वाटत असतं .आमचं     (-आणि प्रत्येकाचंच असतं -)  एकच ध्येय असायचं .... आपल्या मुलांना गरम गरम खिचडी देता आली पाहिजे ! आपली गार झाली तरी चालेल ...     ...

राक्षसाचा जीव ...

     " तर काय झालं, राक्षस परीला म्हणाला, " कोणी काहीही केलं , तरी मला काही होणार नाही !   माझा जीव माझ्यात नाहीये.  साता समुद्रा पलीकडे, एका बेटावरच्या झाडावर एक पोपट बसलाय, त्याच्यात माझा जीव आहे ! ...". लहानपणच्या अश्या गोष्टींची मला फार मजा वाटायची ! तसं खरं असेल का ? असलं तर किती मजा येईल !  ... असं नेहेमी वाटायचं !     खरंच , अशा गोष्टी खऱ्या असतात, बरं  का ! आपल्याला हळूहळू ते कळायला लागतं.  आपण जसेजसे मोठे होतो, तसतसा आपला जीवही वेगवेगळ्या ठिकाणी 'लागत' असतो, हिंडत असतो. काही ठिकाणी तसं फारच temporary वास्तव्य असतं त्याचं.  आपण आयुष्यात जरा स्थिरावलो, की तो जीव ही जरा विसावतो . पण कधी कधी फारच साध्या सुध्या गोष्टींमधे रमतो ,    इतरांच्या मते!      माझ्या मुलांच्या मते ,  माझा जीव माझ्या स्टीलच्या डब्यांमध्ये आहे. कारण असं आहे की .... ते दोघे  hostel मधे असतांना, शनिवार - रविवारी घरी येत आणि अर्थातच सोमवारी सकाळी परत जातांना मला त्यांच्या बरोबर लाडू वगैरे द्यावेसे वाटायचे .  मुलं ...