अभिमन्यु
काही दिवसांपूर्वी नातीबरोबर walk ला गेले होते. तर चालता चालता , एक प्रश्न आला, "आजी. 'catch them young' म्हणजे काय ?" "हे ... कुठे वाचलंस ? सांगते हं, 'catch them young' म्हणजे .." "कोण पळालं , कुणाला पकडायचंय ?"
... आणि ती phrase मनात नाचायला लागली. 'catch them young' म्हणजे उघड आहे, मुलांच्या करता कसल्या तरी 'entrance class' ची जाहिरात असावी ... पण , मग ते पळून चालल्याची भावना ?... 'catch' शब्दामुळे ! जाहिरातदारांना 'उशीर व्हायच्या आत' म्हणायचं असेल ... पण इतकी घाई ... 'rat race' join करायची ... ! कारण, जरा जवळ जाऊन पाहीलं, तर ती जाहिरात LKG - UKG च्या क्लास साठी होती, त्यांना ABCD लवकर यावं, हाताचा control लवकर यावा म्हणून, cognitive abilities develop करण्यासाठी , आणि संध्याकाळी संस्कार वर्ग ... !! मी थक्क झाले.... मग आई-वडील काय झक मारताहेत घरी ? आणि मग मादाम मॉंटेसरी काय म्हणत होत्या बरं ? आणि आता सगळे educationists, academicians, शात्रज्ञ एकीकडे म्हणताहेत की मुलांना त्यांच्या कलाने शिकू द्या, आवडीचं शिकू द्या, आणि इकडे हे दुसरं टोक की 'catch them young' !
कधी कधी डोक्यात विचारांची खूप गर्दी होते, परस्पर विरोधी विचार ... आणि दोन्ही बाजूचे लोक जिंकल्याच्या आविर्भावात ! दोन्ही बाजू जिंकतात, पण मधल्या मधे कत्तल होते ती आईबापांची, आणि मुलं ? ... ते तर 'मातीचे गोळे' ... त्यांचा विचार नाहीच ! आजकाल , लोक अभ्यासाचं फारच मनावर घेतात ... मुलांना जीव आहे, त्यांना आवडी-निवडी आहेत, त्यांची दमणूक होऊ शकते, मुख्य म्हणजे एक चांगलं, fresh विचार करू शकणारं मन आहे हे ते विसरूनच जातात ! ...
आणि शाळाही त्यात अग्रेसर ! शाळेत दुसरीच्या वर्गात talent search साठी जास्तीची पुस्तकं देऊन त्यावर परीक्षा ! ' talent' चा अर्थ, आपण आहोत , त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या पुढचा अभ्यास येणं, असा आहे का ? तर तसं नाही , कोणत्याही वयात वेगळा विचार करू शकणे, 'out of box' thinking म्हणजे talent !! जर बरीच मुलं त्या परीक्षेला बसत असतील, आणि तो जास्तीचा किंवा पुढचा अभ्यास नीट पार पाडत असतील, तर त्याचा अर्थ , ते आहेत त्या वर्गाचा अभ्यासक्रम फार सोपा आहे , असा नाही का ? तसंच , उगीच , आत्ता जरूर नसलेले विषय शिकवणं, हे ही चूकच ! हे सगळं पाहीलं की सारखं एकच दृष्य डोळ्यासमोर येतं ... फुलपाखरांसारखी बागडणारी , खेळणारी , धावणारी , मुलं , ... आणि त्यांच्या मागे माणसं मोठाली नेट्स / जाळी घेऊन धावताहेत ... त्या नेट्स वर वेगवेगळी नावं आहेत ... drawing ... गाणं ...गिटार ... pottery ... हस्तकला ... नाहीतर ...tennis, computers ... extra curricular activities ... extra classes ... catch them young ! ! ...? नवीन कल्पनांची , कलांची लवकर ओळख व्हावी , हे खरं , पण डोक्याला , शरीराला शीण येईपर्यंत ? काही मुलांना एखाद्या कलेची , खेळाची उपजत आवड असते , तिकडे कल दिसतो . तिसऱ्या चौथ्या वर्षी आपण होऊन , त्यात रस दाखवतात , ... त्यांची गोष्ट वेगळी ! पण सगळ्याच मुलांना genius व्हायला लावणं ????
काही जण माझ्याशी वाद घालतात ... मुलांनाच पुढे मदत व्हावी म्हणून आम्ही हे सगळं करतोय ... पुढे उपयोग होईल ... पण , पुढे म्हणजे केव्हा ? मुलं पुढच्या वर्गात जातील तेव्हा त्याच्याही पुढच्या अभ्यासाची जाळी-पिंजरे दबा धरून बसलेली असतील त्यांच्यावर ! वय वर्षे १२ - १४ ला मुलं spiritual solace बद्दल विचारत आहेत ... इतक्यात एवढी प्रगती ??
फुलपाखरं म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते. ४० - ५० वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला, फुलपाखरांच्या जीवनावस्था , वेळ , वगैरे ... आपल्या कोषातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखरांना कोष फाडून बाहेर पडतांना बराच त्रास होतोय, असं पाहून , या शास्त्रज्ञांनी त्यांना कोष कापायला मदत केली. फुलपाखरं बाहेर तर पडली लवकर ... पण त्यांना उडताच येत नव्हतं. कारण त्यांच्या इवल्याश्या पंखांत उडायचं बळ आलं नव्हतं ! कोषातून बाहेर पडायची धडपड करतांना जो व्यायाम होत होता , जो थोडा वेळ मिळत होता ,तो त्यांचे पंख बळकट करत होता . पण ते झालंच नाही , परिणामी त्यांना उडता येईना ... शेवटी ती सर्व फुलपाखरं बिचारी कधीच न उडता, फुलांतला मध न चाखताच सुकून गेली ! मनमुराद उडणं, हेच तर त्यांचं आयुष्य होतं नां ?....
१०वी - १२वीतल्या मुलांचं जरा वेगळ्या तऱ्हेनं असंच होतं ... मोठ्या 'चांगल्या famous' कॉलेजमधे admission मिळवायला हा क्लास, तो क्लास ... त्यांच्या जाहिराती आणि त्याला फशी पडणारे आईबाप ... admission कशी मिळवायची ह्याकरता ... त्यानंतर एकदा आत शिरकाव मिळाला , की मग ? you are on your own ... बुडा का तरा ... ! मग depression ,drinks , drugs , suicides ...
नुकतंच नारायण मूर्ती यांचं एक वाक्य वाचलं, "today's generation is a victim of tyranny of coaching classes !" खूप पटलं ! ...
कधी कधी वाटतं , हे सगळे चक्रव्यूहात जाणारे नवीन युगातले अभिमन्यु ... ! आवाक्याच्या पुढचं पुढचं खूप ज्ञान मिळालेले, पण अर्धवट ज्ञानामुळे धारातीर्थी पडलेले - मारले गेलेले ...
मला वाटतं , ह्या शिक्षणाबद्दल आपण विचार केला पाहिजे , नुसतं जमेल तेवढं ज्ञान डोक्यात कोंबून तो विषय नीट कळणार नाही , आणि त्याचा उपयोग ही होणार नाही .... डिग्री मिळाली , म्हणजे विषय कळला असं नाही . दुर्दैवाने , आजकाल , मार्क हेच मुलांच्या हुषारीचं , ज्ञानाचं मोजमाप झालंय , पण ते एका level पर्यंत .... मला असंही वाटतं की , मुलांना ' How to solve a problem ' पेक्षा ' How to face a problem' हे शिकवलं , तर त्याचा उपयोग , पुढच्या आयुष्यात ही होईल ...हे माझे अनुभवाचे बोल आहेत . माझे ही classes होते ....ह्या सर्वातून मी गेले आहे .
महाभारतातला अभिमन्यु वेगळा होता, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ... मुख्य म्हणजे चक्रव्यूहात उडी घ्यायचा निर्णय त्याचा होता , का नाईलाज होता ? ... आपण आपल्या मुलांवर अशी नाईलाजाची वेळ का आणावी ?...आपल्या हातात एक मोठी शक्ती आहे ... ह्या सगळ्याला 'नाही' म्हणायची ... ! फक्त तेवढी हिम्मत हवी ...!!!
Waa mast एकदम पटले
ReplyDeleteThank you so much!!
Deleteखूपच छान अलका...अतिशय संवेदनशील विषय आहे....मूल 4 /5 वर्षाचे होईपर्यंत त्याच्या हातात पेन /पेन्सिल देऊ नये असे कोर्टा ने मागे कधीतरी सांगितल्याचे आठवतेय...कारण मुलांची बोटे तेवढी सक्षम नसतात...पण लक्षात कोण घेतो
ReplyDeleteहो ना ! आणि आपण काही नाही करू शकत ... Let us hope , हे सगळं दुरुस्त होईल असं ... मनापासून धन्यवाद !
Deleteहो ना ! आपण काही नाही करू शकत ...let us hope ...हे सगळं दुरुस्त होईल केव्हातरी ...
Delete